Skip to main content

Posts

गोष्ट विणलेल्या धाग्यांची

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर एक विनोदी पोस्ट फिरत होती. त्या पोस्टमध्ये पती-पत्नीचा संवाद होता. "पती- अगं, मी तुझ्यासाठी नवी साडी आणली आहे. बघ तरी जरा. पत्नी – (खूष होऊन) अय्या खरंच ? खूप सुंदर आहे पण या रंगाची आणि डिझाईनची साडी आहे माझ्याकडे. कुठून आणली ? पती : तुझ्याच कपटातून आणली. घडी न मोडलेली आहे." बायकांसाठी साड्या हा जिव्हाळ्याचा विषय तर, पुरुषांसाठी चेष्टेचा विषय ठरलेला आहे. कपाटात कितीही साड्या असल्या तरी ‘साडी नाहीच’ हे महिलांचे वाक्य ठरलेले. पण ह्या "साडीत" विशेष असं आहे तरी काय? साडी हा भारतीय स्त्रियांचा खास पारंपारिक, वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र प्रकार आहे. साडी नेसायला अ‌वघड असली तरी, संपूर्ण जगात तिच्याबद्दल अपार उत्सुकता असते. जे वस्त्र नेसल्यावर स्त्री सुंदर, आकर्षित आणि मोहक दिसते, ती म्हणजे साडी. साडी हा शब्द संस्कृत भाषेतील शाटी किंवा शाटिका या शब्दावरुन निर्माण झाला आहे. शाटिका म्हणजे चौकोनी आकाराचे लांब वस्त्र. भारतात साडी नेसण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. जगातील सर्वात जुन्या वस्त्रांपैकी एक वस्त्र म्हणून ही ओळख आहे. साड...

मुंबईच्या वडापावचा प्रवास

दिव्यांची अमावस्या

   आता श्रावण महिना सुरु होणार म्हणून मांसाहार पोट फुटेपर्यंत करा, प्यायची तेवढी दारू प्या आणि गटारात लोळून घ्या (अगदी शब्दशः नव्हे) यामुळे आजचा दिवस हा गटारी अमावस्या म्हणून प्रसिद्ध झाला व यासाठीच वैशिष्ट्यपूर्ण झाला हे दुर्दैव ! दारु, नशा, मांसाहार करायचा हा इव्हेंट झालाय त्यामुळे ह्या दिवसाचे महत्त्व तितके राहिले नाही. खरंतर दिव्याची मनोभावे पूजा करण्याचा हा दिवस. ह्या दिवसाला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या असे ही म्हंटल्या जाते म्हणजेच आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते || पंचमहाभूतांमधील एक म्हणजे अग्नी देव ... त्याचेच रूप म्हणजे आपला दिवा. दिव्याचे स्थान आपल्या घरोघरी देवघरात तर आहेच पण प्रत्येक शुभ कार्यात आपण तेलाचा आणि तुपाचा असा दिवा जरूर लावतो. आपण केलेले एखादे कर्म ह्याची साक्ष म्हणजे दिवा असतो असे आपल्या शास्त्रात म्हंटले आहे. २१ व्या शतकात एका बटणाने अख्ख घर प्रकाशाने उजळून जातं. इथे अग्नी दिसत नाही; डायरेक्ट प्रकाश दिसतो तरी अग्नीचं अस्तित्व आहेच ना? वीजनिर्मिती होते म्हणजे पाणी या पंचतत्व...

पंढरपूर वारी: एक मंत्रमुग्ध अनुभव

गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी

महाराष्ट्र माझा

चाळींचा जन्म