Skip to main content

चाळींचा जन्म

प्रत्येक शहराची युनिक आयडेंटिटी असते, तशीच मुंबईचीही आहे. दहीहंडी, डबेवाले, वडापाव अशा विविध कल्पना मुंबईमध्ये जन्माला आल्या. याच नगरीत चाळीने जन्म घेतला. ह्याच चाळींनी स्वातंत्र्य संग्राम ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा पहिला. काळाच्या ओघात चाळी मोडकळीस येऊ लागल्याने या मधील रहिवाशांनाही पुनर्विकासाचे वेध लागलेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील चाळींचा जन्म ते चाळींचे जतन या विषयीचा हा आढावा. चाळी फक्त मुंबईतच आहेत असे नाही. दुसऱ्या शहरांमध्येही होत्या आणि आहेत; पण मुंबईमध्ये जेवढ्या चाळी आहेत, तेवढ्या इतर शहरांमध्ये नाहीत. ब्रिटिशांनी सैनिकांसाठी बांधलेल्या बॅरेकवरूनच इंग्रजांच्या काळात मुंबईत चाळी प्रथम उभारण्यात आल्या.

मेट्रो सिनेमामागील परिसराला धोबीतलाव म्हणतात. तिथे सैन्याचे बॅरेक होते. ज्याला मरीन लाइन्स म्हणायचे. या बॅरेक पद्धतीची घरे मुंबईत बांधण्यास सुरुवात झाली असा एक समज आहे; पण कागदोपत्री याची कुठेही नोंद नाही. ‘क्वारेंता’ म्हणजे चाळीस या पोर्तुगीज शब्दावरून मराठीमध्ये चाळ हा शब्द आला आहे असा ही एक समज आहे. काळाघोडा परिसरापर्यंत मुंबईचा किल्ला होता. यामध्ये उच्चभ्रू वस्ती होती व मध्यमवर्गीय क्रॉफर्ड मार्केटच्या पुढील भागात राहत होते. तिकडे पहिल्या चाळी येण्यास सुरुवात झाली. एका लहानशा खोलीमध्ये पाच ते सहा लोक राहत असत. आतमध्ये अंघोळ करण्यास मोरी आणि बाहेर शेअर टॉयलेट अशी त्याची रचना होती. त्या वेळी उच्चभ्रू व्यक्तींच्या घरातही टॉयलेट नसायचे. पारशी लोकांनी चाळी बांधण्यास प्रथम सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या गावावरून येणाऱ्या मजुरांच्या वास्तव्यासाठी चाळी बांधण्यास सुरुवात केली. विधवा महिलांसाठीही वेगळ्या चाळी बांधल्या. आजही क्रॉफर्ड मार्केट परिसरात पारशी चाळी आपल्याला दिसतात. शिक्षित आणि श्रीमंत असलेल्या पारशी समाजाने चाळीतून बाहेर पडत, पारसी बाग उभारल्या, अशा गेटेड कम्युनिटी कॉन्सेप्ट पारशी लोकांनी पहिल्यांदा आणली. 

नंतर हळू हळू गिरगावपासून चाळींची सुरुवात झाली. त्या वेळी गिरगाव हे शहराच्या एकदम टोकाला होतं. कॉमन बाल्कनी आणि लाकडाचे स्ट्रक्चर, विटांच्या भिंती अशी या घरांची रचना होती. अविवाहित पुरुष किंवा कोकणामधून आलेल्या लोकांसाठी गिरगावमध्ये चाळी उभारण्यात येऊ लागल्या. त्या काळात मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के लोकसंख्या ही कोकणातून आलेल्या लोकांची होती. १८६० दरम्यान मुंबईत सूतगिरण्या यायला लागल्या. तेव्हा तीन शिफ्टमध्ये काम सुरू झाल्याने कोकणातून कामगार मुंबईत यायला लागले. जे लोक कारकून होते, ऑफिसमध्ये काम करणारे आणि उच्चशिक्षित लोक, असे गिरगावमध्ये राहत होते. कमी उत्पन्ना गटातील माणसं परळ, लालबाग, शिवडी या परिसरात यायला लागली. बहुतांश लोक कोकणातील होती, परंतु शिक्षित आणि अशिक्षित अशी विभागणी येथे झाली. तेव्हापासून गिरगाव आणि गिरणगावमध्ये हा फरक दिसू लागला. (गिरणगाव म्हणजे आत्तचे लालबाग आणि परळ परिसर). १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत असे चित्र होते.

"बीआयटी" चाळींची बांधणी १८९६ मध्ये प्लेगची साथ आली तेंव्हा सुरू झाली. आठवड्याला पाच हजार लोक मरत होती. लगोलग सरकारने मुंबईची साफसफाई करायची ठरवली. यासाठी त्यांनी बीआयटी म्हणजे बॉम्बे इंप्रूव्हमेंट ट्रस्ट असा एक ट्रस्ट चालू केला. या ट्रस्ट द्वारा त्यांनी रस्त्यांवर आणि घरांवर काम केले. घरांचे लोअर, मिडीयम आणि हाय इन्कम ग्रुप असे प्रकार केले. आताच्या चौपाट्यांच्या बाजूला लागून दिसणाऱ्या इमारती, गावदेवीमधील बंगले हे हाय इन्कम ग्रुपमधील लोकांकरिता. मध्यमवर्गीय लोकांसाठी त्यांनी हिंदू कॉलनी, शिवाजी पार्क, खार, चेंबूर अशा विविध ठिकाणी घरे बांधली. यापूर्वी घरबांधणीसाठी चुना आणि लाकडाचा वापर होत होता. पुढे सिमेंट आले. गिरगावातील चाळींची रचना पाहिल्यास कमीत कमी जागेत अधिक घरे बांधलेली आढळतात. त्या वेळी खेळती हवा, सूर्यप्रकाश असावा अशी घरे उभारली.

असंख्य चळवळींचा साक्षीदार १९१८ होता आणि त्याच काळात मुंबईत स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली. तेव्हा आणखी एक नवीन संस्था सरकारने स्थापन केली. या संस्थेचे नाव होते "बीडीडी" अर्थात बॉम्बे डेव्हलपमेंट डायरेक्टोरेट. गिरणी कामगारांच्या घरबांधणी साठी ही संस्था निर्माण केली. या संस्थेने शिवडी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी येथे घरे बांधली. वरळीमध्ये सर्वाधिक जागा होती, या ठिकाणी मैदान निर्माण केले. सध्या असलेले जांबोरी मैदान हे त्यापैकी एक. याच मैदानातून महात्मा गांधींनी भाषण दिले आहे. या मैदानाच्या बाजूला "ललित कला भवन" होतं, काम करणाऱ्या महिलांची लहान मुले ठेवण्यासाठी सुविधा निर्माण केली होती. दलित चळवळी आणि दहीहंडीचा जन्मत्या काळात दलित साहित्याचा जन्म बीडीडी, बीआयटी चाळींमध्ये झालेला आहे. चाळीतील संस्कृती ही खुली होती. कोणाची दारं लॉक नसायची. कुणाचे पोर कुठेही जाऊन जेवायचे. सणाला सर्व जण एकत्रित यायचे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा जन्म याच चाळींत झाला तर दहीहंडीचा ही जन्म चाळीतलाच.

बहुतेक चाळी बैठया असतं. परंतु काही चाळी चार मजल्याच्याही आहेत. साधारण शंभर एक बिऱ्हाडं राहतात. या खोलीत दहा-बारा जणांचं कुटुंब गुण्यागोविंदाने राहात असतं. या खोल्यांचे वैशिष्टय़ एका कोप-यात न्हाणी घर व पिण्याचे पाणी ठेवण्याचा कट्टा. त्यावर हंडा, कळशी, मडक्यांमध्ये पाणी साठवून ठेवत तर दुस-या बाजूला स्वयंपाकाचा ओटा असे. त्याच भिंतीवर डबे व स्वयंपाकाची भांडी लावून ठेवलेली असतं. ओट्यावर स्टोव्ह व खाली चुल मांडलेली असे. सगळे काही चकाचक. गॅलरीत तुळशीचा डबा लटकलेला असे. तेथेच धुणे वाळत घालण्यासाठी तारा किंवा दो-या बांधलेल्या असतं. या चाळीत सार्वजनिक पाण्याचे नळ म्हणजे चाळीतल्या बातम्यांचे मुखपत्र. तेथे चाळीतल्या अनेक घडामोडी कळत व त्या चाळभर पसरत.

काही महत्त्वाच्या चाळी जेवढया इतिहासात गाजल्या तेवढया काही चाळी आज इतिहासजमा झाल्या आहेत. त्यातल्या दादर, गिरगावच्या चाळी जास्त फेमस झाल्या. दादर, गिरगावच्या चाळी या पांढरपेशांच्या चाळी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यात खोताच्या वाडीतल्या व फणसवाडीतल्या चाळी सांस्कृतिक कार्यात फार मोठे कार्य करीत होत्या. लोकमान्य टिळकांनी मुंबईत पहिला सार्वजनिक गणेशोत्सव गिरगावातल्या "केशवजी नाईक" ह्या चाळीत साजरा केला. अश्या चाळीतून मराठी माणसांचे अनेक सण व सांस्कृतिक उत्सव साजरे होत होते. तेजुकाया चाळ, खांडके चाळ, त्याचबरोबर अगदी जुन्या हाजी कासमच्या चाळी मुंबईत नावारूपाला आल्या होत्या. त्यात अठरापगड जाती एकदिलाने राहात होत्या. थोडक्यात एक चाळ म्हणजे एक कुटुंबच जणू हेच या चाळींचे महत्त्वाचे वैशिष्टय़ होते. दोन चाळींच्या मधील मोकळ्या पटांगणात भाषणे होत असतं, गिरगावच्या शांताराम चाळीतील मोकळ्या जागेत कित्येकदा लोकमान्य टिळकांची भाषणे होतं असतं.

अनेक लेखक व नाटककार, इतिहासकार या चाळीतूनच जन्माला आले. परंतु या चाळींमुळे साहित्य क्षेत्रात गाजली ती पु. ल. देशपांडे यांची ‘बटाटयाची चाळ’. ही चाळ साहित्यात अजरामर झाली. मराठी साहित्य आहे तोपर्यंत बटाटयाची चाळ जिवीत राहील.

चाळींमध्ये अपुऱ्या सुविधा, कुटुंबातील सदस्यांची वाढती संख्या आणि मुंबईत दुसरे घर घेणे परवडत नाही; त्यामुळे लोक नाइलाजाने मुंबईलगतच्या शहरात जाऊ लागले. जग बदलते आहे. स्वातंत्र्य आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा ह्याच चाळीतून जन्माला आला ह्याचा मात्र विसर पडता कामा नये. हे जागते हेरिटेज आपण जतन केले पाहिजे. नाही का ?







Comments

Popular posts from this blog

A Complete Travellers Guide to Udupi - Hidden Gem of Coastal Karnataka

As I set out from the bustling city of Hubballi on an early morning, the cool breeze of the Western Ghats promised tales of hidden gems awaiting my discovery. My destination was Udupi, a small coastal town in Karnataka that often finds itself overshadowed by its more famous neighbors like Mangalore and Coorg. However, for those who seek the road less traveled. Udupi is a treasure of experiences waiting to be uncovered. While the town is synonymous with its famous Krishna Temple and of course, the very common Udupi restaurants scattered across the country. But I was determined to go beyond the obvious, to explore the lesser-known nooks and crannies of this town that I suspected held more than what met the eye. This travel guide is your ticket to uncovering Udupi’s well-known landmarks and hidden treasures, alongside personal anecdotes that bring the journey, to life. Best Time to Visit Udupi Udupi's coastal climate makes it a year-round destination, but the best time to visit is bet...

एक तरी वारी अनुभवावी

"ऐक." "बस इथे." "आता किमान पंधरा - वीस दिवस बाहेर असणारेस." "तिथे अजिबात चिडचिड करायची नाही. कोणावर ओरडायचं नाही. दोघे सोबत राहायचं. जपून राहायचं. सांभाळून राहायचं." समोर बसवून आईने, आजीने आणि बाबांनी हा उपदेश दिला. पण मी मात्र पुन्हा वारीला जाणार ह्याचं विचारामध्ये गुंग होते. मागच्या वर्षी वारीचा एक टप्पा कव्हर करता आला पण ह्यावर्शी मात्र पूर्ण वारी कव्हर करायला मिळणार ह्याचा आनंद, उत्साह आणि हुरहूर होती. देहू आणि आळंदी ते पंढरपूर असा साधारण २०० ते २५० कि.मी. चा पायी प्रवास. ज्ञानदेव, तुकोबाचा जयघोष करीत तो लाखोंचा जनसमुदाय चालत निघतो. कुणी डोक्यावर बाचकी घेऊन, कुणाच्या गळ्यात टाळ- वीणा-मृदुंग, तर कोणाच्या माथ्यावर तुळशी वृंदावन ! राम कृष्ण हरी चा मंत्रघोष तर निरंतर सुरूच. एका मार्गाने ज्ञानदेवांची पालखी, तर दुसऱ्या मार्गाने तुकोबांची. या दोन संत श्रेष्ठांबरोबरच इतरही अनेक ठिकाणाहून अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या असतात. वारी ही आपल्याला लाभलेली धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म...

Frames of Aroma - Chikmagalur's Coffee Odyssey

"Into the Heart of India's Coffee Kingdom" In the heart of Karnataka's coffee country, Chikmagalur beckoned with promises of picturesque landscapes and the tantalising aroma of freshly brewed coffee. As a travel photographer, I embarked on a visual odyssey, eager to capture the essence of this serene sanctuary through the lens of my camera. This narrative encapsulates my immersive experience in a coffee plantation stay, where every click of the shutter was a step deeper into the captivating world of Chikmagalur's coffee culture. Chapter 1: Dawn's Palette   As the first light of dawn painted the horizon, I found myself amidst the enchanting vistas of Chikmagalur's coffee plantations. The air was crisp, carrying the intoxicating fragrance of blooming Arabica and Robusta. With the soft glow of sunrise casting a golden hue over the landscape, I embarked on a quest to capture the ethereal beauty of morning in the coffee groves. Each frame immortalised the i...

Badami - A Complete Traveller’s Tale

                         So, here’s how it all started. After scrolling endlessly through Instagram and feeling that familiar itch to escape the city madness, I stumbled upon this gem of a place called Badami, a town I had long heard about but never visited. The journey was as much about exploring the unknown as it was about connecting with history. This town is full of ancient caves, forgotten temples, and stories etched in stone it was like something straight out of a history book. So, without overthinking it (because when do I ever?), I booked my ticket on the Gadag Express and packed my bags. First things first, the Gadag Express is no Shatabdi, but it has its own charm. The journey started with the usual hustle at Dadar station. As the train chugged out of Mumbai, the city’s chaos slowly gave way to the quiet of the countryside. A warm plate of vada pav from a station vendor was my farewell to Mumbai—a last taste of t...

A Journey through flavours

  As I sit by the window, the aroma of freshly brewed chai wafts through the air, blending with the nostalgic fragrance of the spices I collected from the streets of different cities. Today is World Food Day, a day that means much more to me than just celebrating food. For me, it's a chance to reflect on the countless culinary journeys I've taken, each dish a portal into the heart of a place and its people. Food, especially the kind that’s lesser known yet so deeply rooted in culture, has always fascinated me. There’s something about traveling to a destination just to savour a dish that’s both unique and tied to its origins & I’ve always enjoyed uncovering the stories behind these dishes. Travelling has always been more than just ticking off places on a map for me. I’m a firm believer in the idea that a destination’s true essence can be discovered through its food especially when it’s a dish that’s lesser known but packed with history. This thought has taken me through citi...

मुंबईच्या वडापावचा प्रवास