Skip to main content

एक तरी वारी अनुभवावी


"ऐक."
"बस इथे."
"आता किमान पंधरा - वीस दिवस बाहेर असणारेस."
"तिथे अजिबात चिडचिड करायची नाही. कोणावर ओरडायचं नाही. दोघे सोबत राहायचं. जपून राहायचं. सांभाळून राहायचं."
समोर बसवून आईने, आजीने आणि बाबांनी हा उपदेश दिला. पण मी मात्र पुन्हा वारीला जाणार ह्याचं विचारामध्ये गुंग होते. मागच्या वर्षी वारीचा एक टप्पा कव्हर करता आला पण ह्यावर्शी मात्र पूर्ण वारी कव्हर करायला मिळणार ह्याचा आनंद, उत्साह आणि हुरहूर होती.

देहू आणि आळंदी ते पंढरपूर असा साधारण २०० ते २५० कि.मी. चा पायी प्रवास. ज्ञानदेव, तुकोबाचा जयघोष करीत तो लाखोंचा जनसमुदाय चालत निघतो. कुणी डोक्यावर बाचकी घेऊन, कुणाच्या गळ्यात टाळ- वीणा-मृदुंग, तर कोणाच्या माथ्यावर तुळशी वृंदावन ! राम कृष्ण हरी चा मंत्रघोष तर निरंतर सुरूच. एका मार्गाने ज्ञानदेवांची पालखी, तर दुसऱ्या मार्गाने तुकोबांची. या दोन संत श्रेष्ठांबरोबरच इतरही अनेक ठिकाणाहून अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या असतात. वारी ही आपल्याला लाभलेली धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. वारीमध्ये आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंडातील वारीला जात होते, असे सांगितले जाते.
  
       























"वारी एकदा तरी अनुभवावी"
वारीबद्दल मी वाचलेलं-ऐकलेलं हे पाहिलं वाक्य आणि मी ते अनुभवणार होते.अवघा महाराष्ट्र वारीच्या निमित्ताने एकत्र येतो. महाराष्ट्राचं काय! अगदी दुसऱ्या राज्यातून आणि देशातून येतात विठ्ठलाच्या ओढीने. ह्याच विठ्ठलाच्या भेटीसाठी मी ही उत्सुक होतेच. मागच्या वर्षी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तर मिळली पण त्याचं उत्तरांमधून नवीन प्रश्नही उद्भवले आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मी निघाले.

पुण्यातील वारीच्या मुक्कामापासून सुरु झालेला हा प्रवास, अनेक खेड्यापाड्यातून आलेल्या वारकाऱ्यांसोबत पहिल्यांदा संवाद साधण्याची वेळ, हे सगळंच नवीन होतं. वारकऱ्यांचे अफाट अनुभव ऐकून, त्याच्यामध्ये असणारा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीची जाणीव क्षणोक्षणी होतं होती. वासुदेवाच्या वेशात असणाऱ्या एका अवलीयाने दुष्काळ, स्वछता आणि युवकांचा वारीमधील सहभाग यावर ऐकवलेली ओपिनियन ऐकून तर अंगावर काटा आला. आम्ही दिवेघाटात सकाळी ११ वाजता पोहचलो आणि माऊलींची पालखी आली संध्याकाळी ६:३० वाजता. हा पहिलाच दिवस असल्याने दिवेघाटा कव्हर केल्यानंतर वारीत नको जायला असाही विचार मनात आला, कारण जोरदार पाऊस. सतत पडणाऱ्या या पावसामुळे आम्ही पूर्ण भिजलो होतो, त्यामुळे ‘हे जमणार नाही, परत जाऊयात’ असे विचार मनात यायला सुरवातही झाली होती. मात्र कोसळणाऱ्या पावसातही केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीनं, जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही भौतिक गरजा सोबत नसताना वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना पाहून ‘जमेल आपल्यालाही’ हा प्रोत्साहनाचा डोस मिळाला. त्यामुळे आता पंढरपूर गाठायचेचं हा निर्णय मनात पक्का झाला. दिवेघाटाच्या या कव्हरेजने वाटेत किती खडतर समस्या येऊ शकतात, याची झलक दाखवली होती. त्यामुळे आम्ही सासवडच्या दिशेने तयारीनिशी निघालो. आमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आजवरचं आयुष्य मुंबईत घालवल्यामुळे माझ्यासाठी गर्दी, गोंगाट आणि त्या गर्दीत वाट काढत चालणं हे रूप नवं नव्हतं.

                          

हलक्याश्या पावसाच्या सरी, गार हवा आणि पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेल्या वारकऱ्यांसोबत ‘माऊली माऊली’च्या गजरात आमचा प्रवास सुरू होता. वारकऱ्यांच्या बरोबरीने गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत. पण या कसरतीमध्ये आम्ही यशस्वी झालो. रोज नवीन गाव, नवीन परिस्थिती, बदलते हवामान ही सर्व आव्हाने डोळ्यासमोर होती. सासवड मधील मुक्काम संपल्यानंतर हे सर्व वारकरी म्हणजे आपलं एक कुटुंबच आहे असं वाटायला लागलं. एकमेकांची नावही न विचारता निर्माण होणारं प्रेम, जिव्हाळा अतूट असणारे नाती यामुळे अनुभवायला मिळाली. ‘खेळ मांडियेला वाळवंटी काठी…’ असे देवळातील कीर्तन पंढरीच्या वाळवंटात नेण्याचे काम संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले. एकमेकांना माऊली म्हणत एकमेकांचे दर्शन घेणे, पाया पडणे यामध्ये वयाची सुद्धा मर्यादा नसते. खरा माणुसकीचा धर्म हे वारकरी जगत असतात आणि हाच वारीचा संस्कार आहे. हे तत्त्व अलौकिक आहे. त्यामुळे वारीही खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांचा प्रवास सुरू होता. दुरुन कुठून पाहिलं की हे दृश्य खूप मनमोहक दिसायचं. कुठल्यातरी चढावर असा मस्त वारकऱ्यांनी भरलेला रस्ता. नागमोडी वळणावरची ही पंढरीला जाणारी पांढरी रांग आकर्षक वाटायची.

            


असंच एकदा चालता चालता मागून आवाज आला. अनोळखी पण तितकीच जवळची वाटावी अशी हाक कानी पडली. एक आज्जी आवाज देत होत्या.

"ए लेकी" 
"ये इकडं"
"२/४ घटका बस हितं, मगाच्यानं बगतुया नस्ती फिरतेय, फोटु काढतेय, पोटाला खा की कायतरी" म्हंटलं नको आजी मी सकाळीच खाल्लंय भरपूर. तर म्हणाल्या "काय गं, आजी म्हणते आणि आजीने इचारल तर नाय म्हणते?" खूप भावनिक साद होती ती आणि मला नाही म्हणता आला नाही. गुमान बसून त्यांच्या सोबत २/४ मिनिटे गप्पा मारल्या, थोडं पाणी प्यायले.

विठ्ठलाच्या ओढीनं ही म्हातारी-कोतारी पंढरीच्या दिशेने निघतात. पण त्यांच्या मागे असतं ते त्यांचं घरदार, पोरंबाळ आणि लाडकी नातवंडं. त्यामुळे वारीत जी कोणी लहान मुलं दिसतील त्यांच्यात हे त्यांची नातवंडं शोधत असतात.तशीच मी त्यांच्यासाठी एक होते, त्यांची नात. हे सगळे आज्जी आजोबा खूप लाड करतात, "माझी नात भी तुझ्यावनीच हाय बघ" म्हणून हाताने गालाचा छोटुसा मुका घेतात आणि निघताना मात्र हक्काने "उन्हं तन्हाची लई फिरू नगं" म्हणून ताकीद देतात.                  

एकदा अशीच चालून चालून दमले म्हणून एका वारकऱ्यांच्या ग्रुपमध्ये बसले. तर त्या दिंडीतील माऊलींची चौकशी सुरू झाली. "कुठून आली?" "काय करते?" "सोबत कोण आहे?" "बाकीचे कुठेत?" "तुला एकटीला कसं सोडलं?" आणि काळजीपोटी एका आजीने सांगितलंही, "असं एकटी नाही फिरायचं, दोघी तिघींना बरोबर घेऊन फिरत जा. जमाना लई वंगाळ हाय". ही साधी आणि भाबडी माणसं खूप प्रेम देऊन जातात. 

खूप वेगवेगळी माणसं भेटली या वारीत. वयाची बंधनं तोडून सगळे पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झाले होते. अगदी सहा-सात वर्षाच्या मुलांपासून नव्वद वर्षांच्या आज्जींमधला उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्याच नव्वद वर्षाच्या अजींशी गप्पा मारल्यावर, जे लाडाने गालावरुन हात फिरवून कडाकड बोटं मोडीत, म्हणाल्या, "गो बाय खूप मोठी हो" हे आणि असेच आशीर्वाद खूप बळ देतात आयुष्यात.


आश्चर्याची गोष्ट अशी की, एवढा २५० किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा ही वारकरी मंडळी पंढरपुरात पोहोचतात तेव्हा ते देवळात जाऊन मूर्ती पुढे उभे राहून नमस्कार करण्याच्या व त्याच्याकडे काही मागण्याच्या भानगडीत पडत नाहीत. एकदाचे पंढरपूरला पोहोचले, दुरून देवळाच्या कळसाचे दर्शन घेतलं की झाली त्यांची वारी. थोडा वेळ त्या भूमीत थांबून निघतात ते परतीच्या प्रवासाला. म्हणूनच मला तरी वारी हा प्रकार धार्मिकतेच्या अंगाने जाणारा नसून तो जास्त करून सांस्कृतिक परंपरेच्या अंगाने जाणारा वाटतो. प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यापेक्षा वारीत माणसांना उराउरी भेटणं, त्यांच्या सहवासात पंधरा-वीस दिवस घालवणं, त्यांची सुखदुःखं वाटून घेणं, इतरांची सेवा करणं यातच आपला खरा पांडुरंग दडलाय असेच प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून तर प्रत्येकाची धडपड असते ती वारीचा एकदा तरी अनुभव घ्यायचा. अन्यथा पांडुरंगाचं दर्शन काय वर्षभरात कधीही घेता येतं. स्वतःच्या गाडीने, एसटीने वा रेल्वेने ! पण त्याला वारी म्हणत नाही हे खरेच !

आषाढी एकादशीचा दिवस आला, अवघे पंढरपूर 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात नाऊन निघाले होते. तिथल्याच एका ब्रिज वरून मी पाहिलेलं चंद्रभागेच्या घाटाचं दृश्य डोळ्यांना आणि मनाला जे समाधान देऊन गेलं, त्याच्या वर्णनासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. समुद्रकिनाऱ्यावरील एखाद्या बंगल्यातून लाटा दिसतात तसं दृश्य माझ्या नजरेसमोर होतं. इथं होता माणसांचा समुद्र. लाखोंच्या संख्येनं घाटावर पुढे मागे चालणारे वारकरी समुद्राच्या लाटेसारखे भासत होते. वारकऱ्यांचा प्रवाह जेव्हा स्नानासाठी चंद्रभागेच्या प्रवाहात मिसळत होता तेव्हा एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या या दोन प्रवाहांचा मिलाप डोळ्यांचं पारणं फेडणारा होता.


आता परत फिरायची वेळ आलेली, पण जे अनुभवायला मिळालं ते खूप वेगळं होतं, विचारात पाडणारं होतं (अर्थातच चांगले विचार). परतीचा प्रवास सुरु केला. १५ दिवस केलेला प्रवास आता फक्त ५ तासात केला. पूर्ण रस्ते ओसाड होते. जिकडे तिकडे शांतता. ज्या ठिकाणी पालखी विसावा घेत होती ते ठिकाण बघितले कि मन भरून येत होत. पण आजही 'माऊली' कानी पडले तर वारीत असल्याचा भास होतो. पण वारी संपली आणि मग मला पुन्हा अनुभवायला मिळाला तो जात, धर्म, पंथ अशा अनेक कारणांनी विभागलेला भारत.

Comments

  1. खूपच सुंदर अनुभव प्रांजल 👌👌.. असेच छान छान अनुभव share कर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

A Complete Travellers Guide to Udupi - Hidden Gem of Coastal Karnataka

As I set out from the bustling city of Hubballi on an early morning, the cool breeze of the Western Ghats promised tales of hidden gems awaiting my discovery. My destination was Udupi, a small coastal town in Karnataka that often finds itself overshadowed by its more famous neighbors like Mangalore and Coorg. However, for those who seek the road less traveled. Udupi is a treasure of experiences waiting to be uncovered. While the town is synonymous with its famous Krishna Temple and of course, the very common Udupi restaurants scattered across the country. But I was determined to go beyond the obvious, to explore the lesser-known nooks and crannies of this town that I suspected held more than what met the eye. This travel guide is your ticket to uncovering Udupi’s well-known landmarks and hidden treasures, alongside personal anecdotes that bring the journey, to life. Best Time to Visit Udupi Udupi's coastal climate makes it a year-round destination, but the best time to visit is bet...

Badami - A Complete Traveller’s Tale

                         So, here’s how it all started. After scrolling endlessly through Instagram and feeling that familiar itch to escape the city madness, I stumbled upon this gem of a place called Badami, a town I had long heard about but never visited. The journey was as much about exploring the unknown as it was about connecting with history. This town is full of ancient caves, forgotten temples, and stories etched in stone it was like something straight out of a history book. So, without overthinking it (because when do I ever?), I booked my ticket on the Gadag Express and packed my bags. First things first, the Gadag Express is no Shatabdi, but it has its own charm. The journey started with the usual hustle at Dadar station. As the train chugged out of Mumbai, the city’s chaos slowly gave way to the quiet of the countryside. A warm plate of vada pav from a station vendor was my farewell to Mumbai—a last taste of t...

Frames of Aroma - Chikmagalur's Coffee Odyssey

"Into the Heart of India's Coffee Kingdom" In the heart of Karnataka's coffee country, Chikmagalur beckoned with promises of picturesque landscapes and the tantalising aroma of freshly brewed coffee. As a travel photographer, I embarked on a visual odyssey, eager to capture the essence of this serene sanctuary through the lens of my camera. This narrative encapsulates my immersive experience in a coffee plantation stay, where every click of the shutter was a step deeper into the captivating world of Chikmagalur's coffee culture. Chapter 1: Dawn's Palette   As the first light of dawn painted the horizon, I found myself amidst the enchanting vistas of Chikmagalur's coffee plantations. The air was crisp, carrying the intoxicating fragrance of blooming Arabica and Robusta. With the soft glow of sunrise casting a golden hue over the landscape, I embarked on a quest to capture the ethereal beauty of morning in the coffee groves. Each frame immortalised the i...

A Journey through flavours

  As I sit by the window, the aroma of freshly brewed chai wafts through the air, blending with the nostalgic fragrance of the spices I collected from the streets of different cities. Today is World Food Day, a day that means much more to me than just celebrating food. For me, it's a chance to reflect on the countless culinary journeys I've taken, each dish a portal into the heart of a place and its people. Food, especially the kind that’s lesser known yet so deeply rooted in culture, has always fascinated me. There’s something about traveling to a destination just to savour a dish that’s both unique and tied to its origins & I’ve always enjoyed uncovering the stories behind these dishes. Travelling has always been more than just ticking off places on a map for me. I’m a firm believer in the idea that a destination’s true essence can be discovered through its food especially when it’s a dish that’s lesser known but packed with history. This thought has taken me through citi...

Sharing Stories of Chai on International Tea Day

I don’t remember the exact day I fell in love with tea, but I do remember the moment I realized that tea was more than just a drink for me. It was a pause button. A comfort blanket. A travel companion. A reality check. And sometimes, even a compass. On most days, tea is just tea. But on some days, it's the kind when you’re standing on a railway platform with a bag heavier than your future and an itinerary that’s barely an idea, tea becomes your best friend. That one hot sip which tells you, “Yes, this trip is going to be mad and magical, just like you. So, on this International Tea Day, let me spill some tea (literally and metaphorically) from the corners I’ve walked through with nothing, but a backpack filled with stories.  So come, pour yourself a cup and sip along. Chapter 1: Dadar, Mumbai | Departure Doubts Dadar, Mumbai. That name alone feels like movement. Like something is always just about to happen. I was standing on the edge of what would be my first solo trip and Dadar S...